बिनविरोधच्या आरोपांवरून विरोधकांवर टीका मुंबई - बिनविरोध निवडणुकीवरुन विरोधकांची टीका, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्याच ...
बिनविरोधच्या आरोपांवरून विरोधकांवर टीका
मुंबई - बिनविरोध निवडणुकीवरुन विरोधकांची टीका, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्याच टप्यात महायुतीच्या 21 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत पहिल्याच टप्यात महायुतीचे 21 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींना त्यांची पोटदुखी झाली आहे. तुमको मिरची लगी तो मैं क्या करु या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेत आयोजित जाहिर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त टोला विरोधकांना लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विरोधकांना निवडणूकीसाठी उमेदवार मिळत नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तुम्हाला दु:ख का होत आहे ? महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याविषयी विरोधकांकडून नवा नरेटिव्ह पसरविला जात आहे. महायुतीचे उमेदवार जिंकून आले यापूर्वी एव्हीचा नरेटिव्ह पसरविला गेला. आत्ता बिनविरोधला विरोध करण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे.
तेव्हा 35 खासदार बिनविरोध निवडून आले होते
यापूर्वी संसदेत 35 खासदार बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी 33 खासदार हे काफग्रेसचे होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आत्ता महायुतीचे उमेदवार निवडून आले तर लोकशाहीची हत्या झाली अशी टिका करणार्या या सर्वगेविरोधकांनी कुठे तरी आरसा पाहिला पाहिजे असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.
महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला
कल्याण डोंबिवली शहराची ओळख हिंदूत्ववादी आहे. गेल्या 70 वर्षात शहरांचा विकास झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. तसेच 2014 पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकासाच्या माध्यमातून एमएमआर रिजनमधील शहरांना विकास निधी मिळत नव्हता. महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने 4 लाख कोटीचा निधी एमएमआर रिजनमधील शहरांच्या विकासासाठी दिला आहे.

COMMENTS